Sunday, September 23, 2018

गर्भारकविता















खिडकीतून डोकावणारं आकाश 
कवेत घेण्याची स्वप्नं 
रोजच पहावीत
निश्चल समाधीस्त निवांतपणा
तुझीच साधना ती ! 

अंधाऱ्या खोलीच्या आत उजेडायला
एक झरोका पुरेसा 
तू तर अख्खा सूर्य होऊन येतो
प्रचंड प्रखरतेत कवितेच्या कवचकुंडलांना 
उजळून टाकणारा 
तरिही आयुष्याच्या निम्म्या काळासाठी
गुडूप होणारा ! 
त्या रात्रींची चाहूल 
नकोसं करते रोजच ! 
तशी कविता प्रसवत नाही 
रोज रात्री ! 

एकटेपणाच स्वातंत्र्य मुक्तपणे
उधळण्याची संधीही तूच देतोस

डोळ्यांची पिसेदार पंख 
आभाळभर फिरून येतात
तेव्हा खिडकीच होते 
किलकिलत उघडणारे दार 

येत जा गडगडाटासह
असा गर्द होऊन
ओटीत घेईन सारी सळसळ
गर्भारकविता होऊन ! 
     
            -आरती 

Saturday, September 15, 2018

साहचर्य


फोटो क्रेडीट : गुगल



आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर प्रत्येकाच्या वाट्याला असंख्य परीक्षा पाहणारे ,अपेक्षाभंगाचे प्रसंग येतात त्या वेळी अनेक निर्णय घ्यावे लागतात. त्यातले असंख्य निर्णय चुकतात ,प्रयोग फसतात आणि मग असे अनुभव आले की काही काळ निराशा आल्याची भावना, मानसिक थकलेपण आपल्याला येऊ लागते. तरीही या सर्वातून बाहेर पडताना आपली आपल्याला ओळख पटत असते हा स्वानुभव आहे.अशा अनुभवातुनच आपण घडणार आहोत असं स्वतःच्या मनाला समजावणं आणि स्विकारणंही तितकंच आवश्यक ! 

स्वतः निर्णय घेत जगतांना काही जण थोडे बहुत दुखावलेही जातात मात्र आपण फार काही गमावत नाही हेही आपल्याला कालांतराने समजू लागतं !  थोडक्यात काय तर आपण आधी स्वतःसोबत जगायला शिकलं पाहिजे. यामुळे स्वतःची निर्णय क्षमता तर वाढतेच शिवाय स्वतःचा स्वीकार, दुसऱ्यांना अधिक खोल जाऊन समजावून घेऊन, स्वबळावर जगण्याच्या आणि जगणं सुंदर होण्याच्या अनेक शक्यता आपल्याला दिसू लागतात. यातूनच आत्मचिंतनाची आणि आत्मपरीक्षणाची सवय आपल्या मनाला आणि मेंदूला होते. 

आपण जन्माला आल्यापासून एकाच शाश्वत आणि चिरंतन सत्य आपल्याला सोबत करत असते. ते म्हणजे 'स्वतः ची सोबत'... थोडक्यात काय तर ....
मै जिंदगीका साथ निभाता चला गया ...

खरं तर हा प्रवास म्हणावा तितका सोपा ही नाही आणि अवघड ही नाही !  सतत प्रयोग करत राहण्याची हिंमत असेल, आपल्याला स्वतःला काय हवं आहे ही भूमिका ठाम असेल आणि स्वतःमध्ये बदल करण्याची जर आपली तयारी ,उत्साह असेल तर आपलं आयुष्य अनेक वाटांनी बहरु शकतं. मग अमुक एका घेतलेल्या चुकीच्या निर्णयाचा आपल्याला पश्चाताप होत नाही. किंवा तो निर्णय तात्कालिक परिस्थिती पुरताच चुकीचा ठरतो ! 

तसं म्हटलं तर ,आपण कोण कुठली सगळी बंधनं तोडून जगत असतो ? कितीतरी तडजोडी आपण जगताना करतच असतो की ! पण त्या तडजोडी मनाला पटणाऱ्या असल्या पाहिजे तर त्यातआनंद असतो आणि मग ती स्वातंत्र्याच्या परिभाषेत मोडतात. रसरशीतपणे, उत्साहाने जगत असताना कामात बुडून जाऊन त्यातली वेगवेगळी आव्हाने पेलतांना आनंद इतका मोठा असतो हे कळायला लागल्यानंतरच निर्भयता आणि आत्मगौरव प्राप्त होतो ! आनंद अनुभवण्यासाठी सुद्धा ताकद लागते असे म्हणतात आणि ही ताकद आपल्याला या स्वतःच्या साहचर्यातूनच येते !
                                    
                                                               - आरती बोराडे

Friday, September 14, 2018

मन का विश्वास कमजोर हो ना !


 फोटो क्रेडीट : गुगल




मनावर प्रचंड ताण वाढत चाललाय .... 'विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर' 
असं गेल्या कित्येक महिन्यांपासून चालू आहे. किती दिवसांपासून एक वर्ग खोली मिळत नाहीए ! किमान भाड्याची रूम सुद्धा मिळू नये गावात ?  प्रचंड स्ट्रेस वाढत चाललाय असं वाटत असतानाच अचानक कोणीतरी 75 वर्षाचे वयोवृद्ध शाळे जवळ घेऊन विचारतात , "बाई तुला काही अडचण आहे का ? " मी आश्चर्याने विचारते, "तुम्हाला कोणी पाठवलं का ? किंवा " तुम्हाला असं काही कळलं का की मला रुम हवी आहे ?" ,तेव्हा .. "नाही,मी नाशिकला असतो कधीतरी इकडे येतो.माझ्या दोन तीन रूम खाली आहेत आणि जरा इकडे चक्कर मारला तर अस दिसल की एकाच वर्गात शाळा आहे !  अशी कशी शाळा असेल ना ? " ,अर्थात ते बाबा म्हणजे खूप मोठा आशेचा किरण होते. त्यानंतर दुसरी रूम मिळाली हे हेही ठीकच झालं . पण दिवसभराचा किंबहुना गेल्या चार महिन्याचा प्रचंड मोठा स्ट्रेस आज सहनच होईना !  तितक्यात एका मित्राचा फोन येतो कामानिमित्ताने, आणि पहिल्यांदा मी असं म्हणते की , "यार आज मोडून पडायला झालय मला ! " ,तोपर्यंत मैत्रिणीच्या आजारपणाच टेंशन काही कमी झालेलं नव्हतं. गेल्या दोन दिवसापासून केवढी आजारी आहे ! तितक्यात तिसऱ्या मैत्रिणीचा मेसेज येतो की, "अरे ती फोन उचलत नाहीये.तिची खुशाली कळत नाहीये ! " ,मी म्हंटलं , "मीच तिला फोन बंद ठेवायला सांगितलाय.मी बघते ! " पण असं म्हणताना माझं काळीज चिरत गेलं ... खरच फोन उचलत नाहीये ! का ?  काळजी वाटायला लागते ! आणि अचानक तिचा फोन येतो.पण फोनवरच्या आवाजाने ती निश्चितच बरी नाहीये हे कळल्यावर मात्र अजूनच जीव घाबरा होतो. आता घरी पोहोचेपर्यंत खरंच स्ट्रेस सहन होईना की काळजाला बरं वाटेना म्हणून मग घरी आल्याबरोबर गरम पाण्याने अंघोळ केली त्यानंतर आपसूक झाडूकडे हात वळला की , घर साफ केलं तर मन ही साफ होईल असं वाटून गेलं ! एवढयात सोसायटीतून गणपती बसवला आहे त्या ठिकाणाहून गाण्याचे बोल ऐकू आले ,
'इतनी शक्ती हमे देना दाता 
मन का विश्वास कमजोर हो ना 
हम चले नेक रस्ते पे हमसे 
भूलकर भी कोई भूल हो ना 
किती खरे आहे ना ! आपण किती स्ट्रेस घेतो ? किती ताण देतो आपल्या मनाला ? पण एक छोटीशी गोष्ट विसरतो की जर तुम्ही नेक काम करत आहात तर भिती कसली?तुमचं स्वतःशी इमान राखून केलेलं काम क्षणिक दुःखाने , संकटांनी विरून जाणारं निश्चितच नसतं हेच सांगणारे मित्र -मैत्रीणींचे धीराचे शब्द, गाण्याच्या एक लकेर , घर आणि मन अधून -मधून साफ करत राहणं या साऱ्यांतून जगायलाच उर्जा मिळत असते, नाही ?  आणि एका क्षणात हायस झालं तोपर्यंत घर पण झाडून झालं आणि मन पण कसं लख्ख झालं ! 
                        -आरती

Wednesday, September 12, 2018

अती लघुकथा ( अ.ल.क.)

1.
ती - काल दिवसभर range नव्हती.
तो - बरं ! 
ती - पोहोचलास ते फोन करून कळवलंही नाही 
तो - नाही. थकलो होतो.
( शांतता ) 
ती - : झाल ना तुटक जगणं लगेच तिकडे जाऊन ! 
         ( फोन कट झाला.) 
आता पुन्हा त्याच्या क्षणभर शब्दांची वाट पाहणं सुरु झालं.
  
                       - आरती



2.
 "तु सोबत असण हाच मला न्याय असेल ! तु असला की जगणं जगणं असत ,मला तु हवाय सोबत बाकी जग नाही", बोलता बोलता ती अचानक निःशब्द झाली .

                         आरती

3.
       "मी जीवनात दुसऱ्यांदा एवढा अस्वस्थ आहे ", निर्विकारपणे समुद्राकडे पाहत त्यानं बोलायला सुरूवात केली , "एक ते सुरुवातीचे दिवस, रात्र रात्र जागणं, तुझ्यासाठी झुरणं आणि आता हे ! "
        " मी दोषी आहे तुझी " आर्ततेने ती प्रतिसाद देते आहे मात्र नजर मिळवू शकत नाही.
       आज ती समुद्रा किनारी एकटी बसलेली अन सोबत या असंख्य आठवणी 
                         आरती


4.

" मी उत्तर द्यायला बांधील नाही कारण मी माणस बदलत नाही " 
       
" बांधील नसला तरी मी तर तुला बांधले गेले आहे ना ! निदान माझा त्रास तर कमी करशील? " 
               
                        आरती



5.

तू असणं गरजेच आहे जगण्याला ! 

                       आरती

 कुठे गेल्या या टॉपर मुली ?                             माझ्या एका मैत्रिणीचे जेव्हा नुकतेच लग्न झाले होते तेव्हा तिचे आणि तिच्या पतीचे कामा...