-आरती बोराडे
स्वतःची स्पेस निर्माण करून बंडखोरी करत, लिबरल जगणाऱ्या स्त्रियांनी मिळविलेल्या या स्वातंत्र्याचा प्रवास अतिशय खडतर पणे केलेला असतो.याची यत्किंचितही कल्पना नसलेल्या, जबाबदारीने मिळवलेल्या व फुलवलेल्या स्वातंत्र्याची चव काय असते हे न चाखलेल्या असंख्य स्त्रिया अवतीभवती असतात.अशा स्त्रियांचा जेव्हा आपल्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे त्रास होऊ लागतो तेव्हा अशा शिकलेल्या नोकरदार असूनही मूर्ख आणि मेंदूने बेरोजगार असलेल्या स्त्रियांपासून दूरच राहिलेले बरे !
कुठल्याही प्रकारचा सोशल सेन्स न पाळता, वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात फरक न करता उंडारणारे जेव्हा शहाणपण शिकवू लागतात तेव्हा किव येऊ लागते मग त्यांच्या शिक्षणाची ! असे नमुने एखाद-दुसरे असले तरी त्यांचा त्रास इतर स्वतंत्र स्त्रियांना सर्वतोपरी त्या देत असतात किंवा तो त्रास होतोच. त्यामुळे साऱ्याचं स्त्रियांना त्या कॅटेगिरीत मोजले जाऊ लागते.
आमचे स्वातंत्र्य हे जगाला दाखवत सुटण्याची गोष्ट नाही हे तमाम स्त्री पुरुषांनी लक्षात ठेवावे. तो आमच्या जगण्याचा भाग आहे ,ते जीवनाच तत्त्व आहे त्याचमुळे I'm free but not available...हे आमच्या रक्तात भिनलंय, हे माहीत नसणारे कधीही उठून आम्हाला फोन करून स्वतःची भडास काढत असतील तर आम्ही शांततेने ते ऐकून घेतो.मात्र संधी मिळाली की समूळ नायनाट करू शकतो इतकी ताकद आम्ही आमच्या शांततेतून कमावलेली असते.
नोकरीला असणे, हातात पैसा असणे म्हणजे यांचे विश्व विस्तारलेले असतेच असे नाही. पेहरावातून तुम्ही तुमचे स्वातंत्र्य दाखवू शकत असालही तरी पोशाख ही 'काही' 'शो' करण्याची गोष्ट नाहीये, त्यातून तुम्ही फार लिबरल वगैरे दाखवू शकत असला तरी त्यातून तुमच्या मनाची कुरूपता तुम्ही लपवू शकत नाही हेही निश्चितच !
एकवेळ पुरुषांशी वैर, तुलना, स्पर्धा परवडली पण असल्या मेंदूने दरिद्री स्त्रियांपासून दूर राहिलेलेच बरे ! आमचे शील,अस्तित्व आम्हाला जपता येते.आमचे मित्र-मैत्रिणी,आमचे सहकारी, आप्त या साऱ्या नातेसंबंधांचा बॅलन्स आम्हाला करता येतो.त्यात गफलत आम्ही करत नाही.याचा अनेक पुरुष असल्या मूर्ख बायकांच्या बिनडोक कृतींमुळे आमच्याबाबत गैरसमज करून 'अवेलेबल' गटातल्या समजू लागले तर त्यांना वेळीच डोस देणेही गरजेचे ठरू लागते.
अशा अर्धवट स्त्रियांसारखेच काही निर्ढावलेले मूर्ख पुरुषही असतात अवतीभवती.त्यांना तर बायकांच्या खाजगी गोष्टी जाणून घेण्यात फार इंटरेस्ट असतो.पण ते काही लपून राहत नाहीच.योग्य वेळ येताच अशांनाही जरब बसवणे मग आमचे इतीकर्तव्य बनते ! ते होतेच होते वेळ आल्यावर !
त्यामुळे सावध आमच्यापासून ! आमच्याकडे आम्ही जबाबदारीने मिळवलेल्या अस्तित्व आणि शांततेची ताकद फार मोठी आहे.
आमच्या कामात चुका होतील तर त्या दुरुस्त करू, आमचे संबंध कुणाशी बिघडत असतील तर ती सुधारण्याचा प्रयत्न करू मात्र अस्तित्वाचा आणि हक्काचा प्रश्न असेल तर समोरच्यांना निक्षून सांगते आमच्याकडे कटाक्षही टाकू नका आणि त्रास देण्याचा प्रयत्नही करू नका !
- आरती बोराडे
स्वतःची स्पेस निर्माण करून बंडखोरी करत, लिबरल जगणाऱ्या स्त्रियांनी मिळविलेल्या या स्वातंत्र्याचा प्रवास अतिशय खडतर पणे केलेला असतो.याची यत्किंचितही कल्पना नसलेल्या, जबाबदारीने मिळवलेल्या व फुलवलेल्या स्वातंत्र्याची चव काय असते हे न चाखलेल्या असंख्य स्त्रिया अवतीभवती असतात.अशा स्त्रियांचा जेव्हा आपल्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे त्रास होऊ लागतो तेव्हा अशा शिकलेल्या नोकरदार असूनही मूर्ख आणि मेंदूने बेरोजगार असलेल्या स्त्रियांपासून दूरच राहिलेले बरे !
कुठल्याही प्रकारचा सोशल सेन्स न पाळता, वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात फरक न करता उंडारणारे जेव्हा शहाणपण शिकवू लागतात तेव्हा किव येऊ लागते मग त्यांच्या शिक्षणाची ! असे नमुने एखाद-दुसरे असले तरी त्यांचा त्रास इतर स्वतंत्र स्त्रियांना सर्वतोपरी त्या देत असतात किंवा तो त्रास होतोच. त्यामुळे साऱ्याचं स्त्रियांना त्या कॅटेगिरीत मोजले जाऊ लागते.
आमचे स्वातंत्र्य हे जगाला दाखवत सुटण्याची गोष्ट नाही हे तमाम स्त्री पुरुषांनी लक्षात ठेवावे. तो आमच्या जगण्याचा भाग आहे ,ते जीवनाच तत्त्व आहे त्याचमुळे I'm free but not available...हे आमच्या रक्तात भिनलंय, हे माहीत नसणारे कधीही उठून आम्हाला फोन करून स्वतःची भडास काढत असतील तर आम्ही शांततेने ते ऐकून घेतो.मात्र संधी मिळाली की समूळ नायनाट करू शकतो इतकी ताकद आम्ही आमच्या शांततेतून कमावलेली असते.
नोकरीला असणे, हातात पैसा असणे म्हणजे यांचे विश्व विस्तारलेले असतेच असे नाही. पेहरावातून तुम्ही तुमचे स्वातंत्र्य दाखवू शकत असालही तरी पोशाख ही 'काही' 'शो' करण्याची गोष्ट नाहीये, त्यातून तुम्ही फार लिबरल वगैरे दाखवू शकत असला तरी त्यातून तुमच्या मनाची कुरूपता तुम्ही लपवू शकत नाही हेही निश्चितच !
एकवेळ पुरुषांशी वैर, तुलना, स्पर्धा परवडली पण असल्या मेंदूने दरिद्री स्त्रियांपासून दूर राहिलेलेच बरे ! आमचे शील,अस्तित्व आम्हाला जपता येते.आमचे मित्र-मैत्रिणी,आमचे सहकारी, आप्त या साऱ्या नातेसंबंधांचा बॅलन्स आम्हाला करता येतो.त्यात गफलत आम्ही करत नाही.याचा अनेक पुरुष असल्या मूर्ख बायकांच्या बिनडोक कृतींमुळे आमच्याबाबत गैरसमज करून 'अवेलेबल' गटातल्या समजू लागले तर त्यांना वेळीच डोस देणेही गरजेचे ठरू लागते.
अशा अर्धवट स्त्रियांसारखेच काही निर्ढावलेले मूर्ख पुरुषही असतात अवतीभवती.त्यांना तर बायकांच्या खाजगी गोष्टी जाणून घेण्यात फार इंटरेस्ट असतो.पण ते काही लपून राहत नाहीच.योग्य वेळ येताच अशांनाही जरब बसवणे मग आमचे इतीकर्तव्य बनते ! ते होतेच होते वेळ आल्यावर !
त्यामुळे सावध आमच्यापासून ! आमच्याकडे आम्ही जबाबदारीने मिळवलेल्या अस्तित्व आणि शांततेची ताकद फार मोठी आहे.
आमच्या कामात चुका होतील तर त्या दुरुस्त करू, आमचे संबंध कुणाशी बिघडत असतील तर ती सुधारण्याचा प्रयत्न करू मात्र अस्तित्वाचा आणि हक्काचा प्रश्न असेल तर समोरच्यांना निक्षून सांगते आमच्याकडे कटाक्षही टाकू नका आणि त्रास देण्याचा प्रयत्नही करू नका !
- आरती बोराडे