Saturday, April 15, 2017

शब्दांजली .......निर्भायासाठी

घोंघावणारे वादळ
पिसाट सुटला वारा
लपेटलेल्या अंगावर
पिसाळलेल्या नजरा

रानवट लांडग्यांनी
सोडलाच नाही माग
जपावे  स्वतःस किती
अविश्वास जागोजाग

नेऊन सोडावे कुठे 
हे लक्तर स्त्री जन्माचे 
मायेच्या पान्ह्यावरही 
दंश जहरी नागाचे 

सहस्र जखमा झाल्या 
केला घात विश्वासाचा 
ओढीत,कुंठीत जीव 
मागे जोगवा जन्माचा ....


        -आरती बोराडे 

No comments:

 कुठे गेल्या या टॉपर मुली ?                             माझ्या एका मैत्रिणीचे जेव्हा नुकतेच लग्न झाले होते तेव्हा तिचे आणि तिच्या पतीचे कामा...