Tuesday, May 1, 2018

कवितेची वादळवाट


नीर्बीज प्रलोभनं दाखवून
स्वप्नांचा थयथयाट घडवून आणणारी
आपल्या मनातली आशा
सतत का जिवंत ठेवावी ?
उषःकालापूर्वीच अस्त झालेला असतांना !


क्षितिजासारखीच आशाही पांगत गेलेली
' ए जिंदगी गले लगा ले '
म्हणत एक किरण जातो आरपार
थेट मध्यातून ....
काळजाच्या कोपऱ्याकोपऱ्यात
चेतवीत जातो ....
भयंकर तंद्रीत असलेली विस्तवरेषा
काळी फुलं विझावीत त्यासरशी !


पुन्हा एक निष्फळ प्रयत्न
मला उठविण्याचा !
निरागस प्रेमावर ठिगळं जोडून पाहिली तू ..
आतली नस बोटं घालून
उसवीत राहिली रक्ताळलेले रेशीम धागे ...

तू म्हणत राहिलास ,
' चल जाऊ अनंतापर्यंत '
अन मी निवडीत राहिले
 कवितेची वादळवाट ' ....!




- Rती 

1 comment:

SIDDHARTH SAPKALE said...

अप्रतिम आणि हृदयाला भिडणारी वाट... अन् वादळही

 कुठे गेल्या या टॉपर मुली ?                             माझ्या एका मैत्रिणीचे जेव्हा नुकतेच लग्न झाले होते तेव्हा तिचे आणि तिच्या पतीचे कामा...